मुंबईच्या कुर्ला परिसरात पहाटे गौसिया चाळीवर भूस्खलन; दोन जणांचा मृत्यू
मुंबईच्या घाटकोपर परिसरात आज पहाटे भूस्खलन झाले, ज्यात अनेक लोक गाडले गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी सांगितले की, दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, इतर सहा ते आठ जण अजूनही अडकलेले असू शकतात. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून, याच पावसामुळे भूस्खलन झाल्याचे मानले जात आहे.
मुंबईच्या घाटकोपर परिसरातील चिराग नगरमध्ये भूस्खलनामुळे डोंगराचा काही भाग गौसिया चाळीवर कोसळला. अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. दोघांचा मृत्यू झाला असून, अनेकांना वाचवण्यात आले आहे. मात्र, सहा ते आठ जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
Edited By- Dhanashri Naik
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. महाराष्ट्र पोलीस आणि एनडीआरएफची पथके घटनास्थळी उपस्थित आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, दोन मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले असून जखमींनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला आहे.Mumbai landslide: Two dead, 3-4 feared trapped after chawl collapse in KurlaThe incident was reported at 3:48 am at Ghaushiya Chawl at Chiragnagar in Kurla. pic.twitter.com/I0exhPkbMY
— vipin sharma (@vipinsh94839414) August 12, 2026
Edited By- Dhanashri Naik
