1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. student commits suicide in Thane district

बारावीत ९५.७ टक्के गुण मिळवूनही विद्यार्थ्याने आत्महत्या केली; कारण जाणून धक्का बसेल

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात बारावीत ९५.७ टक्के गुण मिळवूनही विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या विद्यार्थ्याने बारावीत विज्ञान शाखेत ९५.७ टक्के गुण मिळवले होते.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या पसंतीच्या संस्थेत प्रवेश न मिळाल्याने एक विद्यार्थी इतका निराश झाला की त्याने आपले जीवन संपवले. धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्या करणाऱ्या या विद्यार्थ्याने बारावीत विज्ञान शाखेत ९५.७ टक्के गुण मिळवले होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, मृत विद्यार्थ्याला बारावी पूर्ण केल्यानंतर शिबपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेऊन बीएस-एमएस दुहेरी पदवी घ्यायची होती. मात्र, प्रवेश परीक्षेत त्याला १०,४७४ वा क्रमांक मिळाल्याने तो खूप निराश झाला. व त्याने टोकाचे पाऊल उचलले. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
फॉर्च्युनर गाडीची रील बनवण्यासाठी संपूर्ण महामार्ग रोखला; पुण्यातील चाकणमधून धक्कादायक व्हिडिओ समोर आला