मासिक पाळीदरम्यान विद्यार्थीनी, महिलांना सुट्टी द्या, जितेंद्र आव्हाडांची मागणी  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  कोची युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या SFI-नेतृत्वाखालील विद्यार्थी संघटनेने मासिक पाळी रजेसाठी मोहिम राबवली. त्यानंतर तेथील सरकारने मासिक पाळीचा निर्णय घेतला. विद्यार्थिनी व नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक पाळी रजा लागू करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. देशभरातील शैक्षणिक संस्था व कार्यालयांना मासिक पाळीची रजा देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मात्र, या याचिकेवरील निर्णय येण्यापूर्वीच केरळ सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थिंनींसाठी मासिक पाळीची सुट्टी जाहीर केली आहे. याआधी बिहार सरकारनेही मासिक पाळी रजा जाहीर केली आहे. त्यानंतर, आता जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र सरकारकडेही हा निर्णय घेण्याची मागणी केली आहे. 
				  													
						
																							
									  
	मासिक पाळीच्या दरम्यान सुट्टी देण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे, ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे. महाराष्ट्र सरकारने देखील असाच निर्णय आपल्या राज्यातील विद्यार्थिनी, महिला शासकीय कर्मचारी यांच्यासाठी घ्यावा, अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करतो, असे आव्हाड यांनी ट्विटमधअये म्हटले आहे.  
	Edited by : Ratnadeep Ranshoor