संबंधित माहिती
- नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा ‘एकला चलो रे’ चा नारा !
- नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी
- आणि गुजरातला आर्थिक राजधानी घोषित केले जाईल : जयंत पाटील
- सभागृहात येण्याची इच्छा नाही, अशी खंत व्यक्त करत भास्कर जाधव नतमस्तक
- स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगलेसह पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढणार
'या 'जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता
रत्नागिरी व रायगडसह राज्यातील पुणे, सातारा आणि नंदुरबार या जिल्ह्यात येत्या चार तासात वीजांच्या कडकडाटसह वादळी पाऊस पडेल असा अंदाज मुंबई येथील वेधशाळेने व्यक्त केला आहे. या कालावधीत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारा वाहण्याची शक्यता या जिल्ह्यांमध्ये काही तुरळक ठिकाणांवर असल्याचे विविध शाळेने जारी केलेल्या बातमीपत्रात म्हटले आहे. या संदर्भात नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. गारपीट आणि पावसामुळे शेकऱ्यांचे नुकसान झाले आहे.राज्यात अवकाळी पावसाची स्थिती अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे झाली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे हवामानात बदल झाला आहे. राज्यात येत्या तीन ते चार दिवस देखील अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor
