संबंधित माहिती
- गळफास लावून व्हिडिओ बनवून केली तरुणाने आत्महत्या, म्हणाला मित्रांनो लग्न करू नका!
- उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये लांडग्यांची दहशत कायम, 5 वर्षीय मुलीवर हल्ला
- नोएडामध्ये एका व्यक्तीने 15 व्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या
- धक्कादायक! मथुरेत 3 महिन्यांच्या वासरूवर तरुणाकडून बलात्कार, आरोपीला अटक
- बाराबंकी येथील शाळेत प्रार्थनेदरम्यान बाल्कनी पडली, 40 विद्यार्थी जखमी तर 5 जणांची प्रकृती गंभीर
यूपीमध्ये बदला घेण्यासाठी लांडगे हल्ला करत आहेत? तज्ज्ञांनी केली मोठी भीती व्यक्त
उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात मानवभक्षक लांडग्यांनी दहशत पसरवली आहे. तसेच जुलै महिन्यापासून गेल्या सोमवारपर्यंत लांडग्यांनी सात मुलांसह एकूण आठ जणांचा बळी घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आईसोबत झोपलेल्या मुलांनाही लांडगे नेऊन खाऊन टाकतात. लांडग्याच्या हल्ल्यात आतापर्यंत महिला, लहान मुले आणि वृद्धांसह सुमारे 36 जण जखमी झाले आहेत. हे लांडगे बदला घेण्याच्या उद्देशाने बहराइचवर हल्ला करत असावेत, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
लांडगे बदला घेणारे आहेत-
बहराइच, यूपीमध्ये वाढत्या लांडग्यांच्या हल्ल्यांसाठी प्रभावित भागात नेमबाजांना तैनात करण्यात आले आहे.तसेच तज्ज्ञांनी मोठी भीती व्यक्त केली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की लांडगे हे सूड घेणारे प्राणी आहेत आणि भूतकाळात मानवाने त्यांच्या शावकांना इजा केल्याचा बदला म्हणून लांडगे हे हल्ले करत असावेत. भारतीय वन सेवेतून निवृत्त झालेले आणि बहराइच जिल्ह्यातील कटरनियाघाट वन्यजीव विभागातील माजी वन अधिकारी ज्ञान प्रकाश सिंह यांनी ही माहिती दिली आहे.
Edited By- Dhanashri Naik