भारतीय संघ १५ ऑगस्ट रोजी ६०० कसोटी सामने खेळणारा तिसरा देश बनून इतिहास रचणार
भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेत दाखल झाला आहे. १५ ऑगस्ट रोजी जेव्हा दोन्ही संघ पहिल्या कसोटी सामन्यात आमनेसामने येतील, तेव्हा तो एक ऐतिहासिक सामना असेल.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ जेव्हा १५ ऑगस्ट रोजी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरेल, तेव्हा तो एक ऐतिहासिक सामना असेल. आतापर्यंत जगात केवळ दोन संघांनी ६०० कसोटी सामने खेळले आहे आणि आता भारतही त्यांच्यात सामील होईल. भारताच्या स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त ही एक मोठी उपलब्धी असेल. दरम्यान, भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला असून लवकरच तयारीला सुरुवात होईल.
भारतीय संघाने आतापर्यंत ५९९ कसोटी सामने खेळले असून, गॉल येथे श्रीलंकेविरुद्धचा सामना हा ६०० वा सामना असेल. भारताने स्वातंत्र्यापूर्वी आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. पहिला सामना १९३२ मध्ये खेळला गेला. त्यावेळी भारताचे कर्णधार सी. के. नायडू होते. तेव्हापासूनचा प्रवास ऐतिहासिक राहिला आहे.
१५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी भारतीय आणि श्रीलंकन संघ आमनेसामने येतील. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जाणार असल्याने, तिचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
Edited By- Dhanashri Naik
भारतीय संघाने आतापर्यंत ५९९ कसोटी सामने खेळले असून, गॉल येथे श्रीलंकेविरुद्धचा सामना हा ६०० वा सामना असेल. भारताने स्वातंत्र्यापूर्वी आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. पहिला सामना १९३२ मध्ये खेळला गेला. त्यावेळी भारताचे कर्णधार सी. के. नायडू होते. तेव्हापासूनचा प्रवास ऐतिहासिक राहिला आहे.
१५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी भारतीय आणि श्रीलंकन संघ आमनेसामने येतील. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जाणार असल्याने, तिचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
