1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Curfew imposed in Aurangabad before Raj Thackeray's meeting

राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेपूर्वीच औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. औरंगाबादेत आजपासून 9 मे पर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यामुळेनिदर्शने, धरणे मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई आदेश लागू झाले आहेत. त्यामुळे 1 मे रोजीच्या राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का याची मोठी उत्सुकता आहे.
 
 पोलीस आयुक्त निखिल गुप्ता  यांनी जामावबंदीचे आदेश देत 5 पेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निदर्शने, धरणे मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई आदेश काढला आहे. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरेयांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुद्धा सुरु आहे.
पुढील लेख
बाबरी पाडत होतो तेव्हा तुम्ही बिळात बसलेलात'; मुख्यमंत्र्यांची भाजपावर जळजळीत टीका