संबंधित माहिती
- वैभव सूर्यवंशीने आशिष नेहराच्या पाया पडून घेतला आशीर्वाद; सर्वांची मने जिंकली
- SRH vs RR : वैभवच्या स्फोटक खेळीने हैदराबादचा धुव्वा उडवला, राजस्थाने बनवले २४३ रन
- SRH vs RR : राजस्थानने हैदराबादला ४७ धावांनी हरवून आयपीएलमधून बाहेर काढले
- SRH vs RR : आज एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने-सामने येणार
- RCB vs GT : क्वालिफायर १ मध्ये गुजरातला हरवून आरसीबी पाचव्यांदा आयपीएल फायनलमध्ये दाखल
GT vs RR : दुसरा अंतिम सामना कोणता संघ जिंकणार, गुजरात आणि राजस्थान भिडणार
आयपीएल २०२६ ची उत्सुकता चाहत्यांमध्ये शिगेला पोहोचली आहे. या हंगामाचा दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होईल.
विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि रविवार, ३१ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाशी सामना करेल.गुजरात आणि राजस्थान यांच्यातील आयपीएल २०२६ सामना शुक्रवार, २९ मे रोजी मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्धा तास आधी, म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता होईल.
राजस्थानविरुद्ध गुजरातची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात आरसीबीकडून पराभूत झाला, तर एलिमिनेटरमध्ये राजस्थानने सनरायझर्स हैदराबादला हरवले. आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान आणि गुजरात यांच्यात एकूण १० सामने खेळले गेले आहेत. यापैकी गुजरातने सात सामने जिंकले आहेत, तर राजस्थानने केवळ तीन सामने जिंकले आहेत. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्स ही मजबूत कामगिरी कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
राजस्थान रॉयल्सच्या यशात वैभव सूर्यवंशी आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांनी मोठी भूमिका बजावली आहे. गुजरात टायटन्सची फलंदाजी शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. जर हे तिन्ही फलंदाज लवकर बाद झाले, तर संघाला मोठी धावसंख्या उभारणे कठीण होते. साई सुदर्शनने संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे
दोन्ही संघांना अंतिम फेरीत पोहोचण्याची सुवर्णसंधी आहे. राजस्थानचा संघ आपल्या युवा खेळाडूंमुळे आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला आहे, तर गुजरातचा संघ अनुभव आणि संतुलित संघ संयोजनावर अवलंबून असेल. आता हे पाहणे बाकी आहे की अंतिम सामन्यात आरसीबीचा सामना करण्याची संधी कोणत्या संघाला मिळते.
Edited By - Priya Dixit
,
