संबंधित माहिती
- चंद्रपूरमध्ये सर्पदंशामुळे ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले
- LIVE: मुंबईच्या चेंबूर परिसरात एका स्कूल व्हॅनवर झाड कोसळले
- महाराष्ट्रात मासेमारी बंदी ७६ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली; सागरी जैवविविधता आणि मत्स्य उत्पादनाला चालना मिळणार
- मुंबईतील चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनवर मोठे झाड कोसळले
- डान्स बारचे नियम अधिक कडक होणार: मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांना मोकळीक दिली
Maharashtra Agriculture Day 2026 : महाराष्ट्र कृषि दिन; इतिहास आणि पार्श्वभूमी
महाराष्ट्राचे हरितक्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात 'कृषि दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या शेती क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान अतुलनीय आहे.
महाराष्ट्रामध्ये वसंतराव फुलसिंह नाईक यांच्या प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी 1 जुलै ते 7 जुलै पर्यंत कृषी दिवस आठवडा साजरा करण्यात येतो. तसेच महाराष्ट्र कृषि दिवस 1 जुलैला साजरा करण्यात येतो. हा दिवस हरित क्रांतिचे जनक वसंतराव फुलसिंह नाईक यांच्या आठवणींमध्ये साजरा करण्यात येतो. हा दिवस राज्यामध्ये कृषि पद्धतींना पुढे नेण्यासाठी शेतकऱ्यांचे समर्पण आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करतो. वसंतराव फुलसिंह नाईक महाराष्ट्राचे सर्वात जास्त वेळपर्यंत राहणारे मुख्यमंत्री होते. माहितीनुसार वसंतराव फुलसिंह नाईक यांच्या सरकारमध्ये राज्यामध्ये अनेक कृषि विद्यापीठ आणि संस्थानांची स्थापना झाली.
इतिहास आणि पार्श्वभूमी
वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी झाला होता. ते महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ (जवळपास ११ वर्षे) मुख्यमंत्री राहिलेले नेते आहे.
हरितक्रांतीचे प्रणेते
६० च्या दशकात जेव्हा देश अन्नधान्याच्या टंचाईचा सामना करत होता, तेव्हा त्यांनी महाराष्ट्रात शेती क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले. म्हणूनच त्यांना 'महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक' म्हटले जाते. त्यांच्या या योगदानाचा गौरव म्हणून १९८९ मध्ये राज्य सरकारने १ जुलै हा दिवस 'कृषि दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रातील योगदान
त्यांनी शेतकऱ्यांना पारंपरिक शेती सोडून आधुनिक तंत्रज्ञान आणि 'तायचुंग', 'आयआर-८' सारख्या संकरित बियाण्यांचा वापर करण्याचे आवाहन केले आणि स्वतः शेतात उतरून प्रयोग केले.
शेती क्षेत्रातील संशोधनाला गती देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली येथे चार स्वतंत्र कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
तसेच "पुढच्या दोन वर्षांत जर आपण धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो नाही, तर मी स्वतः फासावर लटकेन," अशी ऐतिहासिक घोषणा त्यांनी केली होती आणि त्यांनी महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी करून दाखवला.
महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचा कायापालट करणारे आणि राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणारे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त याकरिताच हा दिवस साजरा केला जातो.
Edited By- Dhanashri Naik
